उच्च न्यायालयाने अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीस स्थगिती दिली असताना जिल्हा अंतर्गत बदल्या मध्ये पोस्ट मॅपिंग संचमान्यता 2024-25 नुसार होणार?*
*💥संचमान्यता 2024-25 चे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बदली प्रक्रिया मध्ये होणार?*
💥 *शिक्षक संघटनांनी लक्ष देण्याची गरज*
*👉🏻राज्यात सध्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया सध्या ग्रामविकास विभागामार्फत सुरु असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे*
*👉🏻दुसऱ्या टप्प्यात जिल्हा कार्यालय मार्फत बदली पोर्टल वर रिक्त पदे , सामाणिकरणची अनिवार्य रिक्त पदे कार्यरत पदे भरण्याचे काम सुरू आहे परंतु हे करत असताना बदली पोर्टल साठी संचमान्यता नेमकी कोणती वापरायची याबाबत वरिष्ठ कार्यालयाने कोणत्याही लेखी सूचना देण्यात आलेल्या नाही*
👉🏻 *धुळे ,अहिल्यानगर ,यवतमाळ ,अकोला या जिल्ह्यानी सन 2024-25 ची संचमान्यता पोर्टल वर अपडेट केल्याचे समजते तर काही जिल्हे सन 2023-24नुसार हे काम करत आहे तर काही जिल्ह्यातील 2023-24चे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बाकी आहे.*
*👉🏻दुसऱ्या बाजूला राज्यात सन 2024-25 संचमान्यता मध्ये पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या समायोजन व बदलीला स्थगिती दिली आहे*
*👉🏻 याबाबतीत रत्नागिरी सिधुदुर्ग येथील शिक्षकांच्या समन्वय समिती दाखल याचिका क्रमांक 5456 मध्ये मा उच्च न्यायालय मुंबई यांनी 23 एप्रिल ला व त्यानंतर 5 व 6 मे 2025 ला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या याचिका व इतर याचिकेत सदर आदेश कायम ठेवले आहे असा आदेश देताना बदली प्रक्रियेस स्थगिती आदेश लागू राहणार नाही असे न्यायालयाने नमूद केले आहे*
*👉🏻अशी परिस्थिती असताना संचमान्यता 24-25नुसार बदली प्रक्रिया झाल्यास असंख्य अडचणी निर्माण होणार आहे*
*👉🏻राज्यात 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार केलेल्या 2024-25च्या संचमान्यता मध्ये प्रत्येक जिल्ह्यात 250 ते 350 शिक्षक व राज्यात 10 हजारच्या आसपास शिक्षक अतिरिक्त आहे मग या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया मध्ये समायोजन करणे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार आहे*
*👉🏻बदली प्रक्रिया मध्ये 2024-25 ची संचमान्यता वापरून बदली झाल्यास वर्ग 6 ते 8 मधील ज्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाले आहे ते बदली पात्र असतील अथवा त्यांनी विनंती वरून बदली करून घेतल्यास त्यांचे दुसऱ्या शाळेत आपसूकच दुसऱ्या शाळेवर समायोजन होणार असून त्यामुळे सध्या अतिरिक्त नसलेल्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे . तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद होणार असून 10हजार पदे कायम कमी होणार आहे .*
👉🏻 *वास्तविक शिक्षक समायोजन बाबत ग्रामविकास विभागाचा 18 मे 2011 चा शासन निर्णय आहे त्यानुसार शिक्षक समायोजन होणे आवश्यक आहे*
*👉🏻संचमान्यता 2024-25 नुसार बदली झाल्यास उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती ला कोणत्याही अर्थ राहणार नाही बदली प्रक्रिया चुकीची होणार आहे*
*👉🏻अश्या परिस्थिती मध्ये शिक्षकांच्या राज्य संघटनांनी सन 2024-25 च्या संचमान्यतानुसार कोणतीही कार्यवाही होऊ नये यासाठी लक्ष घालावे आवश्यक आहे*
*👉🏻त्याच प्रमाणे शालेय शिक्षण विभागाने ही परिस्थिती ग्राम विकास विभागाच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे*
*रविंद्र नादरकर*
*जिल्हा सरचिटणीस*
*महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना*
0 Comments